कामगारांच्या वेतनासाठी राष्ट्रवादीतर्फे निवेदन

nivedan jamner

जामनेर प्रतिनिधी । येथील महामार्गाच्या कामावर सिक्युरिटी म्हणून काम करणार्‍यांचे वेतन व्हावे या मागणीसाठी राष्ट्रवातीर्फे पोलीस निरिक्षकांना निवेदन देण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, जळगाव ते औरंगाबाद हायवेचे काम सध्या सुरू आहे. येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणार्‍या कामगारांचे पैसे मिळत नाहीत. तर मजुरांनाही वेळेवर पैसे मिळत नाहीत. यातच रस्त्याला मोठे खडडे पडले आहे त्यामुळे अपघात होत असुन त्यांना त्रास सहन करावा लागत आहेत. यामुळे संबंधीतांचे थकीत वेतन मिळावे यासह रस्त्यावरील खड्डे बुजण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व सामाजिक कार्यकर्ते दत्ता साबळे यांचा वतीने जामनेरचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानक्षेत्रप्रमुख किशोर पाटील, प्रशांत पाटील, दत्ताभाऊ साबळे आदी उपस्थित होते.

Protected Content