जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली पिंपरी येथे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी पाण्याची पातळी वाढावी यासाठी श्रमदान केले.
सध्या तालुक्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पर्यायावरणाचा समतोल बिघडला आहे, जिवंत झाडे तोडल्या गेल्याने सावलीसाठी कुठेच जागा उरलेली नाही. अशा परिस्थितीत समाजाचा एक घटक आहोत, या भावनेतून येथील पोलिसांनी श्रमदानातून नाला खोलीकरणाचे कामही केले.