खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त नागरिकांची महावितरणच्या कार्यालयावर धडक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी रात्री उशीरा महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन आपला रोष व्यक्त केला.

रात्री आठ वाजेच्या सुमारास अनुराग स्टेट बँक कॉलनीसह परिसरातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. बराच वेळ वाट पाहून देखील लाईट येत नसल्याने या भागातील नागरिकांनी महाबळ येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन विचारणा केली.

अनुराग स्टेट बँक कॉलनी परिसराकडे येणार्‍या विद्युत खंब्यांवरून अनेक जण आकोडा टाकून वीज वापरत असतात. यामुळे अनेकदा शॉर्ट सर्कीट होऊन विद्युत पुरवठा खंडीत होत असतो. काल तापमान तब्बल बेचाळीसपर्यंत पोहचल्याने विलक्षण उकाडा होत होता. यातच लाईट गेल्याने नागरिक संतापले होते. येतील अभियंता हेमंत खांडेकर यांनी दोन वायरमन देऊन या भागात पाठविले असले तरी याचा काही उपयोग झाला नाही. रात्री उशीरापर्यंत या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने हा परिसर अंधारात होता.

Protected Content