जिल्ह्यात तीन दिवसांचे कडक निर्बंध लागू; उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप आटोक्यात यावा म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केल्यानुसार काल मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या कडक निर्बंधास Curfew प्रारंभ झाला आहे. यामुळे आगामी तीन दिवसांपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सारे काही बंद राहणार आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढीस लागल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. यातच २८ मार्च रोजी होळी व २९ मार्च रोजी धुलीवंदन साजरे होणार आहेत. त्यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २७ मार्च रोजी रात्री बारा वाजेपासून ते ३० मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत निर्बंध Curfew लागू केले आहेत. यात अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता संपूर्ण बाजारपेठ व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. यानुसार काल मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

खालील प्रमाणे आहेत निर्बंध

* सर्व बाजारपेठ, आठवडे बाजार बंद राहतील.

* किराणा दुकाने इतर सर्व दुकाने बंद राहतील,

* किरकोळ भाजीपाला, फळ खरेदी विक्री केंद्र बंद राहतील.

* शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय बंद राहतील.

* हॉटेल, रेस्टॉरंट (पार्सल सकाळी ९ ते रात्री ९ वगळता) बंद राहील

* सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतीक, धार्मीक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.

* शॉपींग मॉल्स, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलुन, दारू दुकाने बंद राहतील.

* गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षणगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.

* पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीचे ठिकाणे बंद राहतील.

* खासगी वाहतूक बंद राहतील. (अत्यावश्यक सेवा वगळता)

* दुध विक्री केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान सुरू राहतील.

* नियोजित वैधानिक सभा ऑनलाईन पध्दतीने घेता येतील.

* कोवीड लसीकरण केंद्र सुरू राहणार.

* औद्योगीक अस्थापना सुरू राहतील. मात्र यासाठी ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.

* होळी व धुलीवंदन निमित्ताचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द व मनाई राहणार.

तीन दिवसांच्या निर्बंधामध्ये वैद्यकीय उपचार, सेवा मेडीकल स्टोअर्स, अँब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटना यांना सुट देण्यात आली आहे. तसेच Curfew नियमांचे पालन न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत. तर, जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

Protected Content