वाघूर धरणाचे १० दरवाजे उघडले; सतर्कतेचा इशारा

जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील वाघूर धरण पूर्ण भरल्यानंतर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहे. तसेच खालील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार प्रमाणात पाऊस झाला. यामुळे २१ सप्टेंबर२०२१ रोजी सायंकाळी पाच वाजता वाघूर धरण हे पूर्णपणे भरले. यानंतर प्रारंभी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र पावसाचे प्रमाण वाढल्याने आता धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे.

दरम्यान, वाघूर धरणाच्या खालील बाजूला असणार्‍या नदीकाठावरील गावांमधील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कुणीही नदीच्या पात्रात प्रवेश करू नये. तसेच गुरांना नदीच्या पात्रात उतारू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

वाघूर धरणावरून जळगाव शहराला पाणी पुरवठा होत असतो. यामुळे आज वाघूर धरण पूर्ण भरल्याने जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे पाणी टंचाईचे सावट दूर झाले आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे आता जळगावकरांना नियमितपणे पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content