जळगावात दहावीच्या विद्यार्थ्यांचा आकस्मात मृत्यू

om koli

जळगाव प्रतिनिधी । अभिनव शाळेतील 16 वर्षीय दहावीच्या विद्यार्थ्यांचा आकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम नारायण कोळी (वय-16) रा. दिनकर नगर, आसोदा रोड हा दहावीचा विद्यार्थी असून येथील अभिनव शाळेत शिकायला होता. नेहमीप्रमाणे आज दुपारी शाळेत गेला. शाळेची दुपारी जेवणाची सुट्टी झाली त्यावेळी ओमला चक्क येवून बेन्चवरच पडला. हा बाब शाळेतील शिक्षिकेच्या लक्षात आल्यानंतर शाळेचे इतर शिक्षक आणि शिपाईच्या मदतीने तातडीने शाळेच्या बाजूला असलेल्या खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला दिला. जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन विसपूते यांनी मयत घोषीत केले.

मयत विद्यार्थ्यांच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ यश असा परीवार आहे. वडील नारायण बाबुलाल कोळी हे वालवाहू गाडीचे चालक आहेत तर आई मनिषा गृहिणी आहे. दरम्यान ओमचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे समजू शकले नाही. शिक्षकांनी संपर्क करून पालकांना कळविल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. मुला मृतदेह पाहता नातेवाईक व कुटुंबियांनी मन हेलवणारा हंबरडा फोडला. दरम्यान या घटनेबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास सपोउनि सपकाळे करीत आहे.

Protected Content