पाकिस्तानात भारताचं मिसाईल ! तांत्रिक बिघाड झाल्यामुळे घडली घटना

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भारताचं मिसाईल पाकिस्तानात पडल्याचं वृत्त समोर आले आहे. आज शुक्रवारी चुकून भारतानं पाकिस्तानात मिसाईन डागलं गेलं असल्याचं भारत सरकारनं मान्य करत याबाबत खेदही व्यक्त केला आहे.

सुरक्षा मंत्रालयानं शुक्रवारी याबाबत अधिक माहिती जारी केली. तांत्रिक बिघाडामुळे बुधवार, दि.९ मार्च २०२२ रोजी आकस्मित मिसाईल डागली गेली. भारतानं याची गंभीर दखल घेत तातडीनं उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी केले आहेत. पाकिस्ताननं गुरुवारी भारताकडून मिसाईल डागण्यात आल्याचा दावा केला होता. संध्याकाळी सहा वाजून 43 मिनिटांनी एक वेगवान वस्तू भारतीय हवाई क्षेत्रातून झेपावत आली. त्यानंतर मार्ग भटकून ही पाकिस्तानातील हद्दीत घुसली आणि कोसळली, असं मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी म्हटलं होतं.

पाकिस्तानाची पंजाब प्रांतात हे मिसाईल डागण्यात आलं होतं. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजन जनरल बाबर इफ्तिखार यांनी याबाबतचा दावा केला होता. भारताकडून झालेल्या तांत्रिक चुकीचा फायदा घ्यायच्या पाकिस्तानच्या इशाद्यावर संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण देऊन पाणी फिरवले आहे.

“पाकिस्तानच्या हद्दीत मिसाईल पडल्याच माहिती समोर आली असून ही अत्यंत दुःखद घटना आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.” असं सुरक्षा मंत्रालयानं म्हटलंय.

Protected Content