जामनेर तालुक्यातील २२ गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखेंचे उद्घाटन

जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वाघारी बेटावद गटामध्ये भटके विमुक्त जाती जमाती जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील व जिल्ह्याचे नेते संजय गरुड यांचा उपस्थित २२ गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून जामनेर तालुक्याच्या विकास केला जाणार असून गाव तिथे राष्ट्रवादी या माध्यमातून तालुका राष्ट्रवादी मय करणार असल्याची प्रतिक्रिया वाघारी बेटावद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, व्हीजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील, जामनेर तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, युवक तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, जामनेर शहर अध्यक्ष पप्पू पाटील, तालुका सरचिटणीस नटवर चव्हाण, एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे, गजानन गव्हारे, किशोर खोडपे, शैलेश पाटील, अशोक चौधरी, नाना पाटील, डॉक्टर बाजीराव पाटील, पंडित राठोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

वाघारी बेटावद गटातील शिगायत, गारखेडा, मुंदखेडा, नाईक नगर, होळहवेली, तांडा, ओझर खुर्द, लहासर, रामपूर, शंकरपुरा, बेटावद खुर्द, देवळगाव, मोयखेडा, दिगर, वडगाव, वाघारी, नवीदाभाडी, बोरगाव, खडकी अंबिल्होल, डोहरी या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखेची ओपनिंग करण्यात आली.

यावेळी अरविंद चितोडिया यांनी बोलताना सांगितले की, वाघारी बेटावद गटात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केले जाणार आहे, त्याच बरोबर सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली, सदर वाघारी बेटावद गटांमध्ये अरविंद चितोडिया यांना वाढता प्रतिसाद पाहता जिल्हा परिषद उमेदवारी मिळावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांतून होताना दिसत आहे.

Protected Content