रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वनपाल अतुल तायडे यांना वन विभागाच्या योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल धुळ्यातील वनसरंक्षक दि.वा. पगारे यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
वन विभागाच्या विविध योजना मागील तीन वर्षापासुन यशस्वीरित्या राबविल्याबद्दल आहीरवाडीचे वनपाल अतुल तायडे यांना धुळे येथील वन विभागाचे वनसरंक्षक दि. वा. पगारे, यावल उप-वनसरंक्षक पद्मनाभा एच.एस. सहायक वनसरंक्षक प्रथमेश हाडपे यांनी संयुक्त प्रशिस्तीपत्र देऊन उकृष्ट कार्यासाठी स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. तायडे यांच्या कार्याबद्दल वन विभागातील सर्व कर्मचाऱ्यांकडून कौतुक होत आहेत.