पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दादावाडी येथील माहेर असलेल्या विवाहितेला लग्नात हुंडा कमी दिला म्हणून माहेरहून पाच लाख रूपये आणावे तसचे गर्भपात करावा असा दबाव टाकून जीवेठार मारण्याची धमकी देत छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील दादावाडी येथील माहेर असलेल्या जयश्री आशिष पवार (वय-२४) यांचा विवाह धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील आशिष प्रभाकर पवार यांच्याशी रितीरिवाजानुसार २६ डिसेंबर २०२१ रोजी झाला. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती आशिष पवार याने विवाहितेला लग्नाबद्दल टोमणे मारणे सुरू केले. लग्ना हुंडा कमी दिला म्हणून माहेरहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही. म्हणून तिचा छळ करण्यास सुरूवात करण्यात आली. विवाहिता गर्भवती असतांना हा गर्भपात करण्यासाठी सासरच्या मंडळींनी तगादा लावला व जीवेठार मारण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी दादावाडी येथे निघून आल्या. शनिवार १५ ऑक्टोबर रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती आशिष प्रभाकर पवार, सासू खटूबाई प्रभाकर पवार, जेठ किशोर प्रभाकर पवार, जेठाणी अमृता किशोर पवार आणि नणंद कविता पंकज साळुंखे सर्व रा. नांदेड ता. धरणगाव जि.जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर करीत आहे.

Protected Content