पैशांसाठी विवाहितेला मारहाण करत छळ; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्री येथील माहेर असलेल्या विवाहितेला लग्नात हुंडा कमी दिला असे सांगून प्लॉट घेण्यासाठी १० हजार रूपयांची मागणी करत सासरी ठाणे येथे शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हुणबारे पोलीसात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री येथी माहेर असलेल्या सोनाली अतुल राठोड वय २६ यांचा विवाह ठाणे येथील अतुल भालचंद्र राठोड यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. लग्नात हुंडा कमी दिला म्हणून विवाहितेला माहेराहून १० हजार रूपये आणावे अशी मागणी करत तिला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच तिच्या सासरकडील मंडळी यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच अंगावरील श्रीधन काढून घरातून हाकलून दिले. त्यानुसार विवाहितेने शनिवार ९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मेहुणबारे पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती अतुल भालचंद्र राठोड, सासू उषा भालचंद्र राठाडे, दिर अजित भालचंद्र राठोड, ननंद हिना भालचंद्र राठोड, निशा विजय पवार सर्व रा. ठाणे, इंदल लक्ष्मण चव्हाण, लिलाबाई इंदल चव्हाण, दिनेश इंदल चव्हाण तिघे रा. तळोंदे ता. चाळीसगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक अशोक राठोड हे करीत आहे.

Protected Content