सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली : आ. गिरीश महाजन

जळगाव प्रतिनिधी । शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे ठाकरे सरकारचे आश्‍वासन फोल ठरले असून सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची टीका माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केली आहे.

राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीबाबत आ. गिरीश महाजन म्हणाले की, सरकारने तुटपुंजी असून फक्त २ लाख कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांच्या आशेवर पाणी फेरले असून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे. फक्त २ लाखा पर्यत कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना कर्ज माफी मिळणार असून इतर ठिकाणी अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान ही मदत झालेले नुकसान पाहता तोकडी आहे. सरकार स्थापन करताना हे शेतकर्‍याला समर्पित सरकार असल्याचा कांगावा करण्यात आला , सरकारने एक प्रकार शेतकर्‍यांची मोठी चेष्ठा केली असून नाममात्र झालेल्या कर्जमाफी मुळे शेतकर्‍याच्या जखमेवर फुंकर न घालता मिठ चोळण्याचे काम करण्यात आले असल्याचे ठाकरे सरकारने केल्याचा आरोपदेखील गिरीश महाजन यांनी केला आहे.

Protected Content