गणेश राणा यांच्या जाण्याने शिवसेनेचा आधारवड हरवला : गुलाबराव वाघ

e6f4160e c5ca 4355 8e94 a03277ad20b1

 

जळगाव (प्रतिनिधी) माजी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश राणा हे शिवसैनिक घडवणारे नेते होते. त्यांनी ज्यांना-ज्यांना घडवले. ते आज ते मोठ मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. राणाजी आम्हा शिवसैनिकांचे आधारवड होते. त्यांच्या जाण्याने आमचा आधारवड़ हरवला, असे मत शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केले. दिनांक 23 रोजी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख गणेश राणा यांच्या सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन शिवसेना जळगाव महानगरतर्फे करण्यात आले होते. त्या प्रसंगी श्री. वाघ बोलत होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करत असतांना श्री वाघ यांचे डोळे पानावले होते. ते म्हणाले राणाजी आणि माझा 35 वर्षांचा संपर्क होता. मी शालेय जीवनात वावरत असतांना राणाजींच्या भाषणाने प्रेरणा मिळाली आणि शिवसेनेच काम सुरु केले. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला खरा शिवसैनिक गणेश राणा यांच्यात होता, असेही शेवटी ते म्हणाले.

या शोकसभेत एस.पी.कुलकर्णी,जिल्हा संघटक जळकेकर महाराज,ऍड गोविंद तिवारी, उल्हास साबळे, संजय निकुंभ, सुनील माळी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. तर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत,उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, खा. अनिल देसाई, माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे, माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, आमदार राजुमामा भोळे, संपर्क प्रमुख संजय सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख समाधान पाटील आदींचे शोकसंदेश यावेळी वाचून दाखवण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, संघटक दिनेश जगताप, राहुल नेतलेकर सोहम विसपुते, विपिन पवार, जितु गवळी आदींनी परिश्रम घेतले

Protected Content