धक्कदायक : एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या

suside

 

पारनेर (वृत्तसंस्था) अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील एकाच शेतकरी कुटुंबातील चार जणांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

 

बाबाजी विठ्ठल बढे ( वय ३७) पत्नी कविता बढे, मुलगा आदित्य( १५), व धनंजय ( १२) हे चारही जण घरात गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आज सकाळी आढळून आले. बाबाजी यांची पत्नी कविता या मानसिक आजारी होत्या. तर आदित्य हा दिव्यांग होता. सातवीत शिकणारा धनंजय शाळेत अतिशय हुशार होता. सकाळी लवकर उठणारे बढे का उठले नाही म्हणून त्यांनी घराची खिडकी उघडली असता हा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण काय याविषयी अद्याप माहिती समजलेली नाही. दरम्यान, शेतकरी बाबाजी बढे यांनी पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महया केल्याचा संशय व्यक्त होत आहे. बाबाजी विठ्ठल बढे शेती सहा एकर व पशुपालन करुन कुटुंब चालवत होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Protected Content