बांगलादेशचे चार फलंदाज माघारी ; भारताचे वर्चस्व

pink ball

 

कोलकाता वृत्तसंस्था । बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी नशिबाची झोड उठवायला सुरुवात केली. बांगलादेशचा आघाडीचा चार फलंदाजांनी भोपळाही न फोडता माघारी परतले आहे. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशविरुद्धचा पहिल्या सत्रावर आपले अधिराज्य गाजवले.

अवघ्या २६ धावांत बांगलादेशचे पहिले ४ फलंदाज माघारी परतले होते. उमेश यादवच्या गोलंदाजीवर बांगलादेशी कर्णधार मोमिनुल हक झेलबाद झाला. रोहित शर्माने यावेळी स्लिपमध्ये हकचा सुरेख झेल टिपत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रोहितच्या या अफलातून कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रावर आपले अधिराज्य गाजवले आहे.

Protected Content