रोहिणी येथून चाळीस हजारांची गुरें चोरीला

चाळीसगाव: प्रतिनिधी । तालुक्यातील रोहिणी शिवारात शेतातील बांधावर बांधलेल्या  गायीचे  पहाटे पाच वाजता दुध काढण्यासाठी गेलेल्या मालकाला एक बैल व दोन गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले  ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बापू रतन सगळे (वय-३७ ,  रा. रोहिणी ता. चाळीसगाव )  येथे परिवारासह वास्तव्यास आहेत. शेतात एक बैल, एक वासरू व दोन गायी पालनासाठी विकत घेतलेली आहेत. मात्र २४ एप्रिलरोजी रात्री  त्यांचा  भाऊ शंकर सगळे हा गुरांना चारापाणी करून घरी निघून गेला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास बापू सगळे दुध काढण्यासाठी शेतात गेला असता २०,००० रुपये किंमतीचा काळ्या रंगाचा बैल,  २० हजार रुपयांच्या २ गायी   अशी  ४,०००० हजार रुपयांची गुरे मुळजागी दिसून आले नाही.   अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे स्पष्ट होताच. ग्रामीण पोलीस ठाण्यात  बापू सगळे यांनी कलम ३७९ प्रमाणे फिर्याद दाखल  केली  आहे. या घटनेने परिसरात   खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पगारे  करीत आहेत.

Protected Content