छत्तीसगढमध्ये चकमक ; पाच नक्षल्यांचा खात्मा

crpf 1467106168 835x547

 

रायपूर (वृत्तसंस्था) सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्या झालेल्या चकमकीत आज सकाळी पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यानंतर या परिसरातील जंगलांमध्ये मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन सैनिक जखमी झाले आहे.

 

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये शनिवारी सकाळी चकमक झाली. सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

Protected Content