चक्कर येवून बैलगाडीवरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चालत्या बैलगाडीवरून चक्कर येवून पडल्याने जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे रविवारी घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २५ सप्टेंबर रेाजी रात्री दीड वाजता नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदीप नरोत्तम महाजन (वय-४५) रा. नशिराबाद ता.जि.जळगाव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाब‍त पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप महाजन हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. रविवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास हे बैलगाडीने त्यांच्या शेतात जात असतांना रस्त्यावर अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत सोमवारी २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुनिता लेले करीत आहे.

Protected Content