जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षकाला पिस्तूलाचा धाक दाखवत तीन कैद्यांनी आज सकाळी कारागृहातून मित्रांच्या मदतीने दुचाकीवरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्हा कारागृह प्रशासनाच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
जळगाव जिल्हा कारागृहातून आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कैदी सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील रा.शिरूड नाका, तांबापूरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड अमळनेर) यांनी सुरक्षारक्षक ऑनड्यूटी असतांना तिघांनी मारहाण केली आणि पिस्तूलाचा धाक दाखवत मुख्यप्रवेशद्वारातून पळ काढला. यावेळी जिल्हा कारागृहाच्या बाहेर जगदीश पुंडलिक पाटील रा. पिंपळकोठा ता.पारोळा हा दुचाकी घेवून उभा होता. तिघे कैदी जिल्हा कारागृहाच्या बाहेर पडताच जगदीश पाटील यांच्या दुचाकीवर बसून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताचा अपर पोलीस अधिक्षका भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहन, पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्यासह पोलीस पथक रवाना झालेत. दरम्यान, घटनेचा पंचनाम्याचे काम सुरू असून पुढील चौकशीचे काम सुरू आहे.