कॉंग्रेसची तक्रार निवडणूक आयोगाने फेटाळली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या दोन सदस्यांच्या मतदानावर कॉंग्रेस पक्षाने आक्षेप घेतला असला तरी निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळून लावला आहे. यामुळे लवकरच मतमोजणी सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज सकाळी नऊ ते सायंकाळी चार या कालावधीत विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक पार पडली. यात भाजपतर्फे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन सदस्यांच्या मतदानावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही सदस्यांनी भाजपच्या अन्य आमदारांच्या उपस्थितीत व त्यांच्या मदतीने मतदान केल्याचे कॉंग्रेसने म्हटले असून ही दोन मते रद्द करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने कॉंग्रेस पक्षाने केलेली तक्रार ही फेटाळून लावलेली आहे. तर राज्य निवडणूक आयोगाने कॉंग्रेसची तक्रार फेटाळून लावली असली तरी कॉंग्रेसने याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार केली आहे. यामुळे यात जो निर्णय होईल त्यानंतरच मतमोजणी सुरू होणार आहे.

Protected Content