कुणामुळे कुणाची तिकीट कापली गेली, कुणामुळे कोणाचा पराभव झाला, हा पक्षांतर्गत विषय : खडसे

Eknath Khadse and rohini khadse

 

बीड (वृत्तसंस्था) कुणामुळे कुणाची तिकीट कापली गेली, कुणामुळे कोणाचा पराभव झाला. हा बाहेर चर्चा करण्याचा विषय नाही, हा पक्षांतर्गत विषय आहे. पक्षाच्या बैठकांमध्ये हा विषय चर्चेला येईल, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. खडसे हे कन्या रोहिणी खडसे यांच्यासह गोपीनाथगडावर दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

 

यावेळी खडसे म्हणाले की, मागची पाच वर्ष आमचे सरकार असताना येत होतो, आणि आता आमचे सरकार नसताना येत आहोत. सरकारमध्ये असताना आमचे कार्यकर्ते जरा बिझी राहायचे, त्यांना वेळ मिळत नव्हता. नेत्यांनाही नव्हता. आता आमच्याकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे आनंदाने सगळे जण इथे येत आहेत. चंद्रकांत पाटील आता प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पहिल्यांदा ते या ठिकाणी येत आहेत. ते काय बोलणार आहेत याची मला देखील उत्सुकता आहे, असेही एकनाथ खडसेंनी सांगितले. तसेच माझ्या जीवनामध्ये गोपीनाथ मुंडे यांना अनन्यसाधारण स्थान आहे. त्यांच्या सहवासात वर्षानुवर्ष काढल्यामुळे अनेक संस्कार आमच्यावरही झाल्याच्या भावना देखील खडसे यांनी व्यक्त केल्यात.

Protected Content