मला एक संधी दिल्यास जळगावात विकासाची गंगा आणणार – अभिषेक पाटील

Abhishek patil News1

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहराचा विकास हा एकच ध्यास मनात असून जळगावचा अजून खूप विकास व्हायचा आहे. मला एक संधी द्या जळगावात विकासाची गंगा आणेल असे राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी आज पिंप्राळा, खंडेराव नगर, हुडको, आशा बाबा नगर ,तसेच योगेश्वर नगर, खेडी परिसर येथे प्रचारा दरम्यान मतदारांशी संवाद साधतेवेळी केला.

मतदारांशी बोलतांना पुढे ते म्हणाले की, कुटुंबात कधी राजकारण नव्हते. त्यामुळे प्रस्थापित राजकीय डावपेच खेळणे कधी जमले नाही. जे करायचे ते प्रामाणिकपणे. हा एकच शिरस्ता घेऊन काम करतोय. हिमालयाच्या उंचीसमान काम असणार आहे. प्रामाणिकपणे राजकारणात ६० वर्ष घालवून जनतेच्या मनात जागा कोरणारे साहेब आदर्श म्हणून नेहमीच मनात आहेत.

केवळ सामान्यजणांचं हित लक्षात घेऊन काम करत राहणं आवडत असल्याने या क्षेत्रात आलो. वैयक्तिकरित्या कोणावर टीका टिप्पणी करणं न करता मी माझं जळगाव शहराच्या विकासाचं व्हिजन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून सामान्य जळगाववासी नागरिक आज ज्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीला साथ देत आहेत ती यामुळेच. शहराचा विकास हे उद्दिष्ट घेऊन निघालेलो असताना इतर राजकीय खलबतांना किती महत्व द्यावं याची काळजी मी बाळगत नाही. शुद्ध आणि प्रामाणिक भावना घेऊन राजकीय क्षेत्रात जनतेसाठी काम करणे आज आवश्यक आहे असं अनेक मोठमोठी मान्यवर मंडळी म्हणत असते. त्याच विचारांवर पाऊल ठेवून शहरवासीयांसाठी झटणार आहे.

Protected Content