संजय गरुडांच्या प्रयत्नाने तोंडापूर येथील त्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत

शेंदुर्णी प्रतिनिधी | शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंनीकडून शेती वीज कट केल्याची झाली मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सदस्य संजय गरुड यांच्या प्रयत्नातून तोंडापूर येथील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन सुरु करण्यात आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सदस्य जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मा.संजयराव गरुड यांच्या निवासस्थानी जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील जगदीश पाटील, पितांबर पाटील, सुनीता जोशी या शेतकऱ्यांनी भेट घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंनीकडून शेती वीज कट करण्यात आल्याबद्दल तक्रार मांडली. त्यानी विज बिल भरूनसुद्धा वीज मिळत नसल्याबद्दल सांगितले. यांची दखल घेऊन संजयराव गरूड यांनी भ्रमणध्वनीवरून महावितरण अधिकारी बागडे व गारुडे यांच्याशी संपर्क साधला.

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अतिवृषटीमुळे वाया गेला असून रब्बीच्या हंगामाचे दिवस असतांनाच विजेअभावी पिके धोक्यात असल्याचे सांगत शेतकऱ्यांची व्यथा मांडली व शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा पूर्ववत जोडण्याची विनंती केली अधिकाऱ्यांनीही तात्काळ कारवाई करून संबंधित शेतकरी तोंडापूर येथे पोहोचत नाही तोपर्यंत तात्काळ वीज कनेक्शन जोडून विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू केला.

Protected Content