रिक्षाच्या अपघातात चालकाचा मृत्यू; बांभोरी गावाजवळील घटना

जळगाव प्रतिनिधी । प्रवाश्यांना सोडून जळगाव शहरात येत असतांन रिक्षा पलटी झाल्याने चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना एसएसबीटी महाविद्यालय जवळ घडली. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

सविस्तर माहिती अशी की, सतिष सुरेश महाजन (वय-३५) रा. वैष्णवी पार्क, अहुजा नगर हे रिक्षा चालक असून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवार २२ जून रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पाळधी येथे प्रवाश्यांना सोडून अहूजा नगर येथे घरी परतत असतांना बांभोरी गावाजवळील एसएसीबीटी महाविद्यालयाजवळ भरधाव वेगाने रिक्षाने जात असतांना रिक्षा वरील ताबा सुटल्याने रिक्षा पटली झाली. त्यात रिक्षा चालक सतिष महाजन हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमोपचार केले असता रात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई रूख्माबाई, वडीत सुरेश पंढरीनाथ महाजन, भाऊ किरण, रणजित आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. आज सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Protected Content