वाद मिटविणे पडले महागात; दोघांवर चाकू हल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोदावरी कॉलेज चौकाजवळील एका चहाच्या टपरीजवळ वाद मिटवित असतांना अज्ञात पाच जणांनी येऊन चाकू हल्ला करून दोन जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सुशील मनोज जाधव (वय-२०) रा. सुधाकर नगर, एमआयडीसी हा आपला मित्र राकेश गोपाल पाटील यांच्यासोबत मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी कॉलेज चौकावरील माऊली साई टी सेंटर येथे उभे होते. त्यावेळी कालिंका माता मंदिराकडून भरधाव वेगाने दुचाकीवर अनोळखी तीन येत होते. तर चहाच्या टपरीजवळून एक सायकलस्वार जात होता. दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने सायकलस्वराला धडक दिली. यामध्ये सायकलस्वराच्या सायकलचे नुकसान झाले. यावरून त्यामध्ये वाद निर्माण झाला. सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी राकेश पाटील, सुशील जाधव आणि बाजूला उभा असलेला बेकरीवाला सुरेश पाटील यांनी मध्यस्थी केली असतांना यातील अनोळखी व्यक्तीने त्याच्या हातातील धारदार चाकू काढून राकेश पाटील यांच्या पोटावर तर बेकरीवाला सुमित पाटील यांच्या पाठीवर मारहाण करून दुखापत केली. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी धाव घेऊन माहिती घेतली. जखमी झालेल्या राकेश गोपाळ पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Protected Content