मला अटक करण्याचा प्लॅन मविआने रचला होता : फडणविसांचा आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

एबीपी-माझा या वृत्तवाहिनीने माझा महाराष्ट्र-माझे व्हिजन या कार्यक्रमात विविध मान्यवर नेत्यांना बोलते केले आहे. यात बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं मी कोणताही काम केलं नव्हत, किंवा कोणती चूक केली नव्हती. त्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकतील. त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात या सरकारने माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. माझं कोणाशी वैर नाही. मी कोणाशीच राजकीय वैर धरत नाही. आजही त्यांच्याशी वैर नाही. पाच वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम करतो. सरकार चालवतो. त्यांनी फोन नाही उचलला. त्यांनी दार बंद केली. हे त्यांनी केलं की इतर कोणी केलं माहीत नाही असे फडणवीस म्हणाले.

Protected Content