दिव्यांगांच्या समस्या सोडवण्याची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील दिव्यांग व्यक्तींना शासकीय सुविधांचा लाभ मिळावा. नव्या १८ दिव्यांग व्यक्तींचा लाभार्थ्यांमध्ये समावेश केला जावा, अशा मागण्यांचे निवेदन येथील विश्वरत्न अपंग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशोक बाविस्कर यांनी बुधवारी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांगाना केशरी कार्डावर अंत्योदयचा शिक्का मारून नियमानुसार ३५ किलो धान्याचे वाटप केले जावे. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना त्वरित अंत्योदय कार्ड देण्यात यावे. अशा काही मागण्याही या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

Add Comment

Protected Content