दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य वनसंरक्षकाला अटक

नागपूर प्रतिनिधी । दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात निलंबीत मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना आज अटक करण्यात आली आहे.

राज्याला हादरा देणार्‍या मेळघाटच्या वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक करण्यात आली असून अमरावती पोलिसांनी रात्री उशिरा नागपूरात कारवाई केली. दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहलेल्या वरिष्ठ अधिकारी शिवकुमारला याआधीच अटक केली असून श्रीनिवास रेड्डी यांची चौकशी लावली होती. अखेर रात्री उशिरा श्रीनिवास रेड्डी यांना पोलिसाीं बेड्या ठोकल्या.

याआधी या प्रकरणातील प्रमुख आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली होती. अशीच कारवाई एम.एस. रेड्डी यांच्यावरही करावी, यासाठी आंदोलने करण्यात आली होती. यानंतर रेड्डीचे निलंबन करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी झाली होती. आता गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Protected Content