कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

शेंदूर्णी प्रतिनिधी ।  मालखेडा ता.जामनेर येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजाराला कंटाळून गळफास लावल्याची घटना घडली आहे. 

याबाबत आधिक माहिती अशी की, सतिश ईश्वर नाईक (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांचे वडील कॅन्सर या आजाराने यापूर्वीच वारले आहेत आणि आईलाही कॅन्सर आहे दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या आईचेही  कॅन्सरचे ऑपरेशन झाले कै सतिश नाईक हे सततची नापिकीमुळे कर्जबाजारी झाले होते कर्जफेड करण्यासाठी कुठलाही पर्याय नसल्याने शेवटी कर्जाच्या विवंचनेत शेतीही विकावी लागली तरीही कर्ज न फिटल्यामुळे व कुटुंबाचीही जबाबदारी असल्याने शेवटी त्यांनी आज फाशी घेऊन आत्महत्या केली त्यांच्या पश्चात आई पत्नी आणि दोन लहान मुले , असा परिवार आहे ,त्यांच्या जाण्याने मालखेडा परिसरात खूप हळहळ व्यक्त होत आहे. पहुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content