दगडी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दगडी या गावातील एका ४० वर्षीय शेतमजुरांने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना आज (दि.२३) रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेप्रकरणी यावल पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दगडी येथील चंद्रभान शिवदास कोळी वय ४० या शेत मजुरी करणाऱ्या मजुरांने नरहर जानकीराम पाटील यांचा मनवेल शिवारातील शेतातील बांधावर असलेल्या निंबाचा झाडाला गळ्यातील बागायत रुमालाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत इसम हा सकाळी शौचालयास गेला असता उशिरा पर्यत घरी न आल्याने घरच्या मंडळीने विविध ठिकाणी शोध घेतला असता तो नरहर पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला लटकलेला मृत्यू अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली.

चंद्रभान कोळी याने एका खाजगी मायक्रो फायनस कंपनी कडुन कर्ज घेतले होते व गावात तो आपली छोटीशी कीराणा दुकान चालवून आपल्या कटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.कोरोना विषाणु संसर्गाच्या प्रादुर्भाव मुळे मागील सहा महीन्यापासुन जवळपास सर्व व्यवसाय ठप्प झाले असल्यामुळे खाजगी कंपनीकडुन घेतलेले कर्ज व धंद्य किराणा व्यवस्यातआलेली मंदी याला कंटाळुन अखेर चंद्रभान कोळी यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात असुन मयताच्या पश्चात पत्नी दोन मुल दोन भाऊ काका असा परीवार आहे.

यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी .बी .बारेला यांनी मयताचे शवविच्छेदन करुन त्यांच्या नातेवाईकांकडे त्याचे मृतदेह सोपविण्यात आले . दगडी गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात मयत चंद्रभान याचे अंतिम संस्कार करण्यात आले.पोलीस पाटील विठ्ठल कोळी यांनी खबर दिल्यावरुन यावल पौलिस स्टेशनला अक्समात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.

 

 

Protected Content