भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३९ वर

भिवंडी । येथील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातामधील मृतांचा आकडा ३९ वर पोहचला असून ढिगार्‍याखाली अजून काही मृतदेह असण्याची शक्यता आहे.

भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास कोसळली असून याचे बचावकार्य अजूनही सुरूच आहे. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून त्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य सरकारने घोषित केली आहे.

दरम्यान, आज सकाळपर्यंत इमारतीच्या ढिगार्‍याखालून ३९ मृतदेह काढण्यात आले असून हा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. आजवर या इमारतीच्या ढिगार्‍याखालून २५ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तर अजूनही काही जण याखाली अडकल्याची शक्यता असून बचावकार्य आता वेगाने सुरू करण्यात आले आहे.

Protected Content