यावल येथे भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण ; मनसेने दिला पाठिंबा

यावल प्रतिनिधी । येथील आदीवासी एकात्मिक विकास प्रकल्प जिल्हा कार्यालयातील भ्रष्टाचार विरुद्ध कार्यवाही व्हावी व तात्काळ या भ्रष्टाचारामधील सहभागींवर कार्यवाही व्हावी, यासाठी आमरण उपोषण करण्यात येत असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.  दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपोषणास लेखी पाठिंबा दिला आहे.

या आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष जनहित रावेर विभाग चेतन अढळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणा ठीकाणी भेट दिली व त्यांना त्यांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या भ्रष्ठाचारविरोधी लढयास पाठींबा दिली आहे . संदर्भात वृत्त असे की कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील शासकीय आदिवासी वसतीगृहातील पाणी पुरवठा व देयकांमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि पाणी पुरवठादारांनी संगनमताने आदिवासीच्या निधीचा अपहार केला आहे. याची चौकशी करून आदिवासींना न्याय मिळावा यासाठी आदीवासी एकता विद्यार्थी परिषदेच्या वतीने यावल येथील आदीवासी विकास एकात्मीक प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील शासकीय आदिवासी वसतीगृहात सन २०१६ ते जानेवारी २०२ पर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतू पाणी पुरवठ्याच्या बिलांमध्ये खाडखोड केले असून बिलांवर शिक्का व स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. तसेच बिलांवर आणि बिल बुकावर नंबर हाताने टाकलेले आहेत. तसेच चार देयकांची रक्कम ही कर्मचारी गृहपाल डी.बी.पाटील यांचे नावे तर कधी कर्मचारी म्हणून तर कधी देयकात विद्यार्थी म्हणून धनादेशाद्वारे जमा केलेली दिसते. एकलव्य महिला आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटात चिंचोली यांना सन २०१८-१९ या वर्षांत टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजूरी दिलेली आहे. परंतू संबंधित पुरवठ्याचे पाणी पुरवठ्याबाबतचे प्रमाणपत्र आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी तपासणी अहवालही घेतलेला नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरचा नंबरही नाही. याप्रमाणे निधीचा अपहार केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.

पंरतू अद्याप कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याने आज आदीवासी एकता विद्यार्थी परिषदेच्या वतीने यावल येथील आदीवासी विकास एकात्मीक प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल गायकवाड, जिल्हाध्यक्ष करण हरदास सोनवणे, जिल्हा सचिव यशवंत अहिरे, टंट्या भिल ब्रिगेडचे महेंद्र मोरे, कृष्णा मोरे यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे. दरम्यान आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असुन काल रात्री उशीरा पर्यंत आदीवासी एकात्मीक विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी उपोषणाच्या ठीकाणी भेट दिली व त्यांच्या मागण्या संदर्भात चर्चा केली. मात्र याबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष जनहित चेतन अढळकर, विभागप्रमुख आबीद कच्छी, आकाश चोपडे, किशोर नन्नवरे आदी पदाधिकारी  याप्रसंगी त्यांच्या सोबत होते. या भ्रष्ठाचारात सहभागी असलेल्या भ्रष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या मनसे स्टाईलने उत्तर देईल असे पाठींबा पत्रात म्हटले आहे.

 

Protected Content