गुराखी बालकांना तिघांनी पाजले विष; पित्याचा आरोप

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गंगापुरी येथील एका गुराखी मुलास तिघांनी विष पाजून त्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्या पित्याने केला असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, गंगापूरी येथील श्रीराम बारेला हे शेती व्यवसाय करतात. त्यांचा १० वर्षाचा मुलगा शिवाजी श्रीराम बारेला हा नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी १० वाजता घरची असलेले काही जनावरे शेतात चारण्यासाठी घेऊन गेला. मात्र त्यातील काही जनावरे हे शेजारच्या सोयाबीन पेरलेल्या शेतामध्ये घुसून त्यांनी काही पिकाची नासाडी केली. यामुळे रागाच्या व संतापाच्या भरात शेतमालक कमोल वेरसिंग बारेला (वय ४०), रामदास गिलदार बारेला (वय ४४), अमोल बेरसिंग बारेला (वय ४५) या तिघांनी श्रीरामच्या घरी जाऊन भांडण केले. यानंतर त्यांनी दुपारी २ वाजता गुरे चारणारा शिवाजी याला बळजबरीने विष पाजले. विष पाजत असताना शिवाजीची १२ वर्षाची बहीण रिंगू व त्याचा लहान भाऊ विक्रांत घटनास्थळी उपस्थितअसे सांगून श्रीराम बारेला यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. यानुसार पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

Protected Content