काव्यरत्नावली चौकात २५१३ गणपती मुर्त्या संकलित

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दल व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या प्रेरणेने युवाशक्ती फौंडेशन व भवरलाल ॲण्‍ड कांताबाई जैन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक येथे जळगाव शहरातील सर्वात मोठे गणपती मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. पहिली मूर्ती सकाळी ७ वाजता रमेश पाटील या कुटुंबाकडून आली व शेवटची मूर्ती रात्री ९.१५ राजेश जावहाराणी कडून आली. एकूण २५१३ मुर्त्या संकलन झाल्या.

संकलित मुर्त्यांचे विधिवत विसर्जन मेहरूण तलाव येथे युवाशक्ती फौंडेशनच्या स्वयंसेवकांकडून करण्यात आले.
सदर केंद्रावर विसर्जन आरती व श्रीफळ फोडण्यासाठी विशेष व्यवस्था होती. या सह येणाऱ्या सर्वांची नावनोंदणी केली जात होती. या ठिकाणी सेनिटीझर सुद्धा ठेवण्यात आले होते. दिवसभरात १ ट्रक, ३ ट्रॅक्टर व २ दंफर च्या एकूण १९ चक्कर काव्यरत्नावली ते मेहरूण तलाव येथे करण्यात आल्या.

सकाळी १० वाजता स्वतः जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या घराचा गणपती या ठिकाणी संकलित केला. पहिल्या चक्कर मधील ट्रकचे २२३ गणपती मेहरूण तलावावर स्वतः जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, मनपा आतुक्त सतीश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधीक्षक नीळभ रोहन यांनी उतरवल्या. शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या मुर्त्या संकलित केल्या. शहरातील सर्व मुख्य अधिकाऱ्यांनी या केंद्राला भेट दिली.

नागरिकांचा केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. यशश्वीतेसाठी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, प्रीतम शिंदे, पियुष हसवाल, अर्जुन भारुळे, पियुष तिवारी , दर्शन भावसार, आकाश वाणी, करण शहा, भवानी अग्रवाल, तृषान्त तिवारी, सागर सोनवणे, जयेश पवार, अनिमेश मुंदडा, ऋषिकेश जाखेटे, कन्हैया सोनार, पवन चव्हाण, संदीप सूर्यवंशी, यश ठाकरे, अमोल गोपाळ, राहुल चव्हाण, इत्यादी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content