२७ जानेवारीपासून सुरू होणार पाचवी ते आठवीचे वर्ग !

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची घोषणा आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

लॉकडाऊनच्या नियमांमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता हळूहळू सुरू होत आहे. आधी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  

राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. दरम्यान, शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

 

 

 

Protected Content