सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिक सुविधांपासून वंचित – अभिषेक पाटील

abhishek patil app

जळगाव, प्रतिनिधी | जळगावकर नागरिक तब्बल एका महिन्याच्या वर कालावधीपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप आज (दि.१८) येथील शहर मतदार संघातील महा आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक पाटील यांनी नागरिकांशी बोलताना केला आहे.

 

शहरातील खोदलेले रस्ते, त्यामुळे झालेले खड्डे, कचरा यावर उपाय शोधणे सत्ताधाऱ्यांना कठीण झाले आहे. त्यांचा सुंदर शहर विद्रुप करण्यात चांगलाच हातखंडा झालेला आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. त्यामुळेच जळगाव शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, तुमच्याकडून एक संधी हवी आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Protected Content