वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने नागरिकांना ये -जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार निवेदन देवून ही प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
धरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर मध्ये सुमारे दहा हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे या सिद्धेश्वर नगर ला जाण्यासाठी रेल्वे पुलाखालील एकच मार्ग असून या पुलाखाली पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठते, त्यामुळे वयोवृद्ध लहान मुलांना या पाण्यातून मार्ग काढत जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे, रेल्वे पुलाखाली साटणाऱ्या पाण्याची कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा म्हणून अनेक वेळा स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला निवेदने दिली ,प्रसंगी उपोषणही केली परंतु याचा प्रशासनाला कोणताही फरक पडला नाही, परिस्थिती जैसे थे असल्यामुळे या भागातील नागरिक वैतागून गेले आहेत. प्रशासनाने तात्काळ संबंधित समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांची या समस्येतून सोडून करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.