आदिवासींसाठी वर्षाला कोट्यावधी खर्च करून बालक कुपोषणग्रस्त-विनिता सोनवणे

यावल प्रतिनिधी । शासनाकडून आदीवासी वस्ती व पाड्यांसाठी विविध योजनांतर्गत ८ कोटी रूपयांचा निधी दिला जातो. असे असतांना यावल तालुक्यात आठ महिन्याच्या बालक कुपोषणाचा बळी पडतो ही शोकांतिका असल्याचे  एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास अधिकारी विनिता सोनवणे यांनी सांगितले. 

यावल तालुक्यातीत वड्री आसराबारी येथील आदीवासी वस्तीवर मागील महीन्यात कुपोषणामुळे ८ महीन्याच्या आकाश बारेला नावाच्या बालकाचा जळगाव जिल्हा रूग्णालयात दुदैवी मृत्यु झाला. यानिमित्ताने तालुक्यात महिला व बालविकास विभाग व आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ आणि  भ्रष्ट कारभाराचे पितळ पडून सत्य समोर आले आहे. हा प्रकार घडण्यापुर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत तालुक्यातील कुपोषणग्रस्तांची धक्कादायक आकडेवारीसमोर आल्यानंतर  महीला व बालविकास तथा आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षीत कारभारावर सीईओ आशिया यांनी नाराजी व्यक्त केली होती.

विनिता सोनवणे यांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या आदीवासी वस्तीवर वास्तव्यास राहणाऱ्या आदीवासी बांधवांच्या चिमकुल्या मुलांसाठी एपीजे अब्दुल कलाम अमृत पोषणहार या योजनेच्या माध्यमातुन आदीवासीच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येवु नये, यासाठी शासनाच्या वतीने वर्षाला सुमारे ३ कोटी रुपयांचे खर्च केले जातात. आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातुन आदीवासी बांधवांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती मोहीम राबवुन त्यांच्या कुटुंबाची युद्ध पातळीवर काळजी घेण्यासंदर्भात विविध आरोग्य योजने अंतर्गत वर्षाला ५ कोटी रूपयांचा निधी खर्च केला जात असतात अशी माहीती प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिली. आदिवासी विभागाअंतर्गत केलेल्या शोध कार्यात देखील आदीवासी योजनेच्या अमलबजावणी संदर्भात अनेक गंभीर प्रकार समोर आले असुन आमच्या ही स्वतंत्र चौकशीचा अहवाल हा वरिष्ठापर्यंत पाठविण्यात आले आहे. असे असतांना ही जळगाव जिल्ह्यात व यावल तालुक्यात कुपोषणग्रस्तांची वाढलेली संख्या ही धक्कादायक व शासकीय योजना या खऱ्या अर्थाने आदीवासी वस्ती व पाडया वाडयांवर फक्त कागदावरच पहोचलेली दिसुन येत असुन, प्रत्यक्षात या योजनांची अमलबजावणी झालेली नसल्यानेच कुपोषणाचे धक्कादायक वास्तव समोर आलेत. या सर्व कुपोषणग्रस्तांच्या विषयाला  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .पंकज आशिया यांनी गांर्भीयाने घेतले असुन , कुपोषण संदर्भातील निष्पक्ष चौकशी व्हावी या दृष्टीकोणातुन त्रियसदस्यांची नेमकुण केली व समितीच्या अहवालावरून कुपोषणग्रस्त आट महीन्याच्या बालकाच्या मृत्यु प्रकरणी ७ जणांना शॉकॉज नोटीसा पाठविल्या असुन , पुढील होणाऱ्या कार्यवाहीकडे विविध राजकीय पक्ष समाजसेवी संघटना व आदीवासी बांधवांसह सर्वांचे लक्ष लागुन आहे .

Protected Content