जळगाव, प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजानादेश यात्रा काढली होती. मात्र ही यात्रा कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या जलआपत्तीमुळे स्थगित करण्यात आली होती. आता या दोन्ही जिल्ह्यावरची जल आपत्ती टळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात जळगाव येथिल सागर पार्क येथे महाजानादेश यात्रा होणार आहे.
भाजपकडून या यात्रेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात आ. सुरेश भोळे यांनी माहिती देतांना सांगितले की, महाजानादेश यात्रेनिमित्त नागरिकांमध्ये उत्साह आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जळगाव शहराला भरभरून मदत दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वागत जोरात झाले पाहिजे याचा प्रयत्न केला जात असल्याचेही आ. भोळे यांनी सांगितले.