जळगाव प्रतिनिधी । अनुलोम संस्थेच्या कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जळगाव विमानतळावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जैन हिल्स येथे आयोजित अनुलोम संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले होते. अत्यंत मोजक्या लोकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रयाण करण्यापूर्वी आमदार स्मिताताई वाघ, आ.राजूमामा भोळे, आ.चंदुलाल पटेल, माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे निरोप देण्यासाठी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले होते.