महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील सुमारे दोन कोटी ऐंशी लाख ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला महावितरणचा एक टोल फ्री क्रमांक बदलण्यात आला असून नवीन नंबर १८००-२१२-३४३५ असा असणार आहे तर पूर्वीपासून सुरू असलेल्या १८००-२३३-३४३५ , १९१२ व १९१२० या क्रमांकात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

या क्रमांकावर ग्राहक विद्युतपुरवठा खंडित वा आपत्कालीन परिस्थितीच्या तांत्रिक बिघाडाकरिता, तसेच चालू वीज दर, वीज दरातील बदल, वीज देयक विषयक तक्रारी, नवीन वीजजोडणी सारख्या वाणिज्यविषयक तक्रारींकरिता तसेच वीज चोरी, नावातील बदल, नादुरुस्त वीज मीटर बदलणे आदी तक्रारी या उपलब्ध क्रमांकावर नोंदवू शकतात.

खंडित वीज पुरवठ्यासाठी मिस कॉल सेवा
याचबरोबर महावितरणतर्फे खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारीसाठी मिस कॉल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या क्रमांकात बदल करण्यात आला आहे. ग्राहक नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपली तक्रार नोंदवू शकतात. ज्या ग्राहकांनी अद्याप आपले मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवले नाहीत; ते ग्राहक महावितरण मोबाईल ॲपद्वारे किंवा वरील टोल फ्री क्रमांकावर फोन करून आपला ग्राहक क्रमांक सांगून आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करू शकतात.

Protected Content