जळगाव, प्रतिनिधी । शासनाचे आदेश असतांना अद्यापपर्यंत गहू, ज्वारी, मका खरेदी करण्यास सुरूवात झालेली नाही. त्यामुळे शासनाच्या वतीने त्वरीत खेरदीला सुरूवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केले. आज मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, शासनाकडून गहू खरेदीच्या सूचना देऊन एक आठवडा झाला आहे, परंतु पोर्टलमधील अडचणीमुळे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या गव्हाची प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही. तसेच अवकाळी वादळ, पावसामुळे शेतकऱ्यांच्या ज्वारी व मका या पिकांचे नुकसान होत असल्याने या पिकांचे तातडीने खरेदी सुरू करण्याच्या संबंधितांना सूचना व्हाव्यात, असे म्हटले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, जिल्हा समन्वयक विकास पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.