अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील जळोद येथील रहिवासी तथा बीएसएफमध्ये कार्यरत असणारे महेंद्र ईश्वर चौधरी यांचे मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
महेंद्र ईश्वर चौधरी, (वय ४५ ) हे जळोद येथील रहिवासी असून सीमा सुरक्षा बलात (बीएसएफ) राणीनगर, सिलीगुडी ) पचिम बंगाल येथे कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि मुलगी, आई एक भाऊ असा परीवार आहे. त्यांच्या निधनाने जळोद गावावर शोककळा पसरली आहे.