ब्रेकिंग न्युज : बांभोरी पुलावरून एकाने घेतली उडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी पुलावरून एका ४५ वर्षीय व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची खडबड जनक घटना मंगळवार १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर गोविंदा नन्नवरे वय-४५, रा.बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी गावाजवळ तापी नदीच्या पुलावरून ज्ञानेश्वर गोविंदा नन्नवरे वय्- 45 यांनी मंगळवार १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही, दरम्यान ही घटना गावातील गुरखी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर खाजगी वाहनाने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी यांची मयत घोषित केले. दरम्यान या घटने प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्याचे अंतर्गत पारधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात प्रतीची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी विवाहित मुलगी दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती .

Protected Content