खळबळजनक : हातकणंगलेतील मुडशिंगी गावातून ६९ गावठी बॉम्ब जप्त

 

71715881

 

कोल्हापूर (वृत्तसंस्था) कोल्हापूर गुन्हे शाखेच्या पथकाने हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी येथून राहत्या घरात गावठी बॉम्ब तयार करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ६९ गावटी बॉम्ब जप्त करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

विलास राजाराम जाधव (वय ५२) व आनंदा राजाराम जाधव (५४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं असून हे दोघे भाऊ आहेत. त्यांनी डुक्कराची शिकार करण्यासाठी बॉम्ब बनविल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, उजळाईवाडी येथील उड्डाण पुलाखाली १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या स्फोटात ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील (न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) हे ठार झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, बॉम्ब शोधक, नाशक पथक, विशेष तपास पथक (एसआयटी) आणि स्थानिक पोलिसांची पथके तैनात केली होती. त्यानुसार पोलिसांनी उजळाईवाडी स्फोटाशी कनेक्शन शोधत शोधत या दोघं भावांना अटक केली आहे.

Protected Content