महाराष्ट्रात कुणाचेही सरकार बनू नये यासाठी भाजपाचे प्रयत्न ; कॉंग्रेसचा खळबळजनक आरोप

congress bjp 647 033117014707 0 20180481176 1

जयपूर (वृत्तसंस्था) भाजपाचे सरकार बनणार नसेल तर राज्यात कुणाचेही सरकार बनू न देण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप कॉंग्रेसचे काँग्रेस नेते महेश जोशी यांनी जयपूरमध्ये केला आहे.

 

जोशी यांनी जयपूरमध्ये म्हटले की, भाजपाचे सरकार बनणार नसेल तर राज्यात कुणाचेही सरकार बनू न देण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. जर राष्ट्रपती शासन महाराष्ट्रात लागू झाले तरी हे त्यांच्याच फायद्याचे असेल, असेही जोशी यांनी म्हटले आहे. आमदारांसोबत फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी काँग्रेसने आमदारांना थेट महाराष्ट्राबाहेर, म्हणजेच काँग्रेस प्रशासित राज्यात अर्थात राजस्थानमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. दरम्यान, आज सकाळपासून सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसच्या हालचालींना वेग आला आहे.

Protected Content