भाजपकडून केंद्रातील सत्तेचा गैरवापर-शरद पवारांचा आरोप

कराड वृत्तसंस्था । भाजपने केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत सरकार स्थापन करत असल्याचा आरोप आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक असणार्‍या प्रितीसंगम येथे शरद पवार यांनी आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी भाजवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, भाजपने बहुमत नसतांनाही सरकार बनविले आहे. यासाठी केंद्रातील सत्तेचा गैरवापर करण्यात आला. अजित पवार यांनी हे पाऊल का उचचले यावर उत्तर देणे त्यांनी टाळले. तर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार सत्तारूढ होणार असल्याचा आशावाददेखील त्यांनी व्यक्त केला.

Protected Content