जि.प. निवडणुकीत राज्यत सगळ्यात मोठा पक्ष भाजपाच – फडणवीस

Devendra Fadnavis 1

मुंबई, वृत्तसंस्था | “राजकीय गणित बदलले असतानाही सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सगळ्यात मोठा पक्ष आम्हीच ठरलो. आमच्या १०३ जागा आल्या. त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सगळ्या जास्ता जागा आमच्या आल्या. पण राजकीय गणित बदलले असल्याने आम्हाला नव्याने तयारी करावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक लागल्याने तयारीच झाली नव्हती. पण पुढच्या वेळी तयारी करु,” असा विश्वास माजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर बोलताना फडणवीस यांनी विश्लेषण करण्याआधी मला आत्मचिंतन करावे लागेल, असेही म्हटले आहे. “नागपूर जिल्हा परिषद अनेक वर्ष आमच्याकडे होती. कधी सत्तेत असताना होती तर कधी विरोधी पक्षात असताना होती. मागील वेळी आमच्या २१ जागा आल्या होत्या. शिवसेनेच्या आठ, नऊ जागा आल्या होत्या. आम्ही एकत्रितपणे सत्तेत आलो होतो. यावेळी आम्ही वेगळे लढलो आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढली. आमच्या जागा २१ वरुन १५ वर आल्या तर शिवसेनेच्या सात जागा कमी झाल्या. एकूण जे राजकीय गणित आहे ते नव्याने तयार झाले आहे. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागेल”.

Protected Content