भाजप क्लीन बोल्ड झाल्याचे स्वीकारा – नवाब मलिक

Nitin Gadkari Nawab Malik

मुंबई प्रतिनिधी । राज्यात सत्ता स्थापनेवरून मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. राजकरण हे क्रिकेटप्रमाणे असून यात कधीही काहीही होऊ शकते असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले होते त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप क्लीन बोल्ड झालाय हे स्वीकारा म्हणत गडकरींना टोला लगावला आहे.

नवाब मलिक म्हणाले, “गडकरी क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते हे सांगत आहे. या शक्यतेला आम्हीही नाकारत नाही. मात्र, क्रिकेटमध्ये जसा एखादा खेळाडू क्लीन बोल्ड होतो, तसंच भाजपला जनतेने क्लीन बोल्ड केलं आहे. हे त्या लोकांनी स्वीकारलं पाहिजे.” मलिक यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार भाजपचंच येणार या दाव्याचाही समाचार घेतला. ते म्हणाले, “फडणवीस त्यांच्याकडं 105 आमदार असल्याचं आणि 119 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगत आहेत. मग राज्यपालांकडे त्यांनी सरकार बनवू शकत नाही हे का सांगितलं? सरकार बनवण्यासाठी 145 आमदार लागतात. 145 आमदारांशिवाय कोणतंही सरकार स्थापन होणार नाही.”

भाजपकडं बहुमतासाठी आवश्यक आमदारांची संख्या नाही. त्यांनी सत्तेसाठी लोकांना पळवून एकत्र केलं होतं. आता हे लोक सोडून जावू नये म्हणून त्यांना आपलं सरकार येणार असं सांगावं लागत आहे. हळूहळू त्यांनाही आपलं सरकार येणार नाही हे कळेल, असंही मलिक यांनी नमूद केलं.

Protected Content