सण-उत्सव साजरे करताना भान बाळगावे – डीवायएसपी पिंगळे

shantata kamity

फैजपूर, प्रतिनिधी | गणेशोत्सव व दुर्गोत्सव साजरे करतांना मूर्तीच्या उंचीची मर्यादा असली पाहिजे, त्याचे भान आपण मंडळातील पदाधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे. आपण स्वतःला खूप हिंदू म्हणून समाजात वावरत असतो आणि आपणच देवतांची विटंबना करतो. यापेक्षा आपले दुर्दैव कोणतेच नाही, असे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी आज(दि.७) येथे झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सांगितले.

 

गणेशोत्सव, दुर्गोत्सव व अन्य सण साजरे करण्यासंदर्भात आज संध्याकाळी ५.०० वाजता येथील पोलीस स्टेशनात शांतता कमिटी व मंडळाचे पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार जितेंद्र कुवर, एपीआय प्रकाश वानखडे, उपनगराध्यक्ष रशिद तडवी, मासाका संचालक नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, नगरसेवक शेख कुर्बान, डॉ.जलील, पालिका आरोग्य निरीक्षक सुमित साळूखे, रविंद्र होले यासह गणपती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

डीवायएसपीपिंगळे यांनी सांगितले की, मूर्तीची उंची ही पाच फुटांपर्यंत असली पाहिजे, त्यापेक्षा मोठी उंची आणू नये. मोठ्या मूर्तीचे विसर्जन करतांना त्या मूर्तीची विटंबना आपणच करतो. नदीतील पाणी कमी झाल्याने त्या मोठया मुर्त्याचे व्यवस्थित विसर्सन न झाल्याने त्याच अवस्थेत राहता आणि प्रदूषण तयार होते. त्यामुळे मूर्तीची स्थापना करतांना पर्यावरण पुरकच असली पाहिजे. बॅन्डच्या आवाजाची मर्यादा तपासली जाईल. गणेशोत्सव व दुर्गोत्सव यामध्ये मोठ्या आवाजाचे बँड आणले जातात त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होतो. बँडचे जास्त आवाज असल्यास त्या बँड पथकावर मिरवणूक संपल्यावर पोलीस स्टेशनला जमा करून गुन्हे दाखल केले जातील. यावेळी तहसिलदार जितेंद्र कुवर, एपीआय प्रकाश वानखेडे, मासाका संचालक नरेंद्र नारखेडे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीचे सुत्रसंचलन माजी नगरसेवक केतन किरंगे यांनी केले तर आभार एपीआय प्रकाश वानखडे यांनी मानले.

Protected Content